काही शहरांनी केलेत बदल स्वतः मध्ये
तर काहींमध्ये घडवून आणलेत,
अनुभवले आहे या शहरांनी बदललेली माणसे
आणि बदललेल्या रस्त्यांपासून इमारती परेंत..
तर ठेवलीय ओळख काही शहरांनी
जपत आपले असतित्व आणि वेगळेपण जसे,
गुलाबी जयपूर, दिल्ली ची राजेशाही
मुंबई चे साम्राज्य आणि सिमला चे सौंदर्य, सिलीगुडी ची घोडागाडी आणि कोलकात्याची ट्राम गांधीनगर ची खादी आणि बंगलोर चे तंत्रज्ञान
आणि हो, होतोय खेद सांगताना आणि
शरम हि वाटतेय कि याच शहरांमध्ये घडलेय ,
गोध्रचे हत्याकांड, भोपाल ची दुर्घटना आणि निर्भय ची केस ..
पाहिलेय या शहराने झालेल्या चळवळी,
आणि समावेष्ट झालेली गावे
आणि घेतलेय कवेत सर्वाना
कोणताही विरोध न करता…
फक्त नाही झाला बदल
तो समस्यांमध्ये आणि समाजामध्ये
अजुनी बराच समाज चालतोय
त्याच अनिष्ट, जाचक परंपरा मध्ये..
काही शहरांनी केलेत बदल स्वतः मध्ये
तर काहींमध्ये घडवून आणलेत,…….. @विशाल जानुगडे पाटील